*** मुख्यमंत्री समृघ्द पंचायत राज अभियाना अंतर्गत पाचोड (ठाकुर) येथे ग्रामसभा *** मोठ्या संख्येने नागरिक होते उपस्थीत *** वृक्षारोपण सुध्दा करण्यात आले.

आर्वी,दि.२०:- मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियाना अंतर्गत पाचोड (ठाकुर) येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ग्राम विकासाच्या अनेक शासकीय योजनांवर सखोल चर्चा झाली. तसेच वृक्षारोपण सध्दा करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
या सभेत मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाचे महत्व पटवुन देत गावाचा विकास कसा साधता येतो याची माहिती दिल्या गेली. तसेच याची अमंल बजावणी कशी करता येईल यावर सुध्दा चर्चा करण्यात आली. याशिवाय हे अभियान योग्य पध्दतीने व परदर्शीपणे राबवीण्याकरीता ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक युवती यांना यात कसे सहभागी होता येईल याची सुध्दा माहिती देण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्तें वृक्षारोपण सुध्दा करण्यात आले.
या सभेत सरपंच सौ. नीलिमा सुधाकर राठोड, उपसरपंच किशोर धनसिंग राठोड, सदस्य इंदुबाई मदन राठोड, अनुसया ओमचंद जाधव, ललिता अनिल जाधव, रवींद्र रोहिदास राठोड, जीवन अंबादास राठोड, सुंदर किशोर राठोड, ग्राम विकास अधिकारी उमेश दहिवडे, पोलीस पाटील चंदू पवार, मुख्याध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ता सुधाकर राठोड, चंद्रसिंग जाधव, कैलास चव्हाण आदि प्रामुख्याने उपस्थीत होते.